नागपूर : Nagpur Accident News | लग्नावरुन परत येत असताना भरधाव कार ट्रकला जाऊन धडकल्याने कारमधील ६ जणांचा मृत्यु झाला. हा अपघात नागपूर जिल्ह्यातील काटोल मार्गावरील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ मध्यरात्री घडला. (Nagpur Accident News)
मयूर इंगळे (वय ३६), वैभव चिखले (वय ३९), सुधाकर मानकर (वय ४२), विठ्ठल थोटे (वय ४५), अजय चिखले (वय ४५) व रमेश हेलोंडे (वय ४८, सर्व रा़ मेंढेपठार, ता. कटोल) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. तर जगदीश ढोणे यांच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (Nagpur Accident News)
हे सर्व रहिवासी काटोल तालुक्यातील मेंढेपठार गावातील रहिवासी होते. मेंढेपठार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या
मुलीचे लग्न नागपूरला होते. त्यासाठी हे सर्व जण नागपूरला आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर कारने गावी परत
जात होते. यावेळी त्यांची कार भरधाव असताना एका ट्रकला वेगाने धडकली. त्यात कारचा चुराडा झाला.
कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यु झाला असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ‘तु लय मोठा भाई झालास का?’ म्हणून दोन भावांना बेदम मारहाण; कोथरुड परिसरातील घटना, दोघांना अटक
- धक्कादायक! पुण्यात कचऱ्यात सापडले नवजात अर्भक, सिंहगड रस्ता परिसरातील घटना
- आमदार अपात्रता प्रकरण : राऊतांची विधानसभा अध्यक्षांवर टीका, ”दीड वर्षांपासून डमरू वाजवण्याचा खेळ…”
- 17 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन विनयभंग, खडकी परिसरातील घटना