नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकासाठी शिवसेनेच्या खासदारांनी मोदी सरकारला साथ देत विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे. या विधेयकावर काँग्रेस आक्रमक झालेली असताना शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नाराज झाली आहे. याबाबत नाराजी व्यक्त करताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, विधेयकाच्या बाजूने मतदान करणार नाही, असे शिवसनेने म्हटले होते, मग असे का केल ते कळत नाहीत.
दलवाई म्हणाले, नागरिकत्व विधेयकाच्या मतदानावेळी मतदानापासून तटस्थ राहण्याची भूमिका शिवसेनेला घेता आली असती. मात्र, त्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही. समाजात फूट पाडण्यासाठी नागरिकत्व विधेयक आणलेले आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे. हे विधेयक संविधानाला धरुन नाही. भाजपा राज्यघटना मानत नाही, अशी नाराजी दलवाई यांनी व्यक्त केली आहे.