Sudhir Mungantiwar On Chhagan Bhujbal | विधानसभेच्या जागावाटपावरून भाजप नेत्याने भुजबळांना चांगलेच फटकारले, म्हणाले…

0

मुंबई: Sudhir Mungantiwar On Chhagan Bhujbal | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या टप्प्यातील मतदान १ जूनला असणार आहे तर ४ जून रोजी मतमोजणी असणार आहे. मात्र यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election Maharashtra) दृष्टिकोनातून दावे – प्रतिदावे सुरु आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल आहे असे चित्र दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महायुतीत अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते. याबाबत आता छगन भुजबळ यांनी भाष्य करत विधानसभेला लोकसभेप्रमाणे खटपट होऊ नये असे म्हंटले आहे.

भुजबळ म्हणाले, ” आमचे ५० ते ५४ आमदार आहेत. त्यातील दोन चार इकडे तिकडे गेले असतील. पण महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हाही त्यांनी आपल्याला ८०-९० जागा देण्याबाबत आश्वासन दिले गेले होते. आला लोकसभा निवडणुकीवेळी जी काही खटपट झाली. ती पाहता पुढे अशी खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना सांगितलं पाहिजे. तेवढ्या जागा मिळाल्या तर त्यातून ५०-६० आमदार निवडून येतील. असे भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्या याच विधानावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केलेला आहे. ” लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल या निवडणुकांच्या अनुषंगाने होणारे जागावाटप मीडियाच्या माध्यमातून होत नसते. काही कारण नसताना यातून अडचणी , समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपाबाबत अजित पवार किंवा इतरांचे काही मत असेल तर गृहमंत्री अमित शाह , जे. पी नड्डा , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चर्चा केली पाहिजे. मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्या आहेत असे म्हणणे गैर आहे. याबाबत तुम्हाला कोणी ठामपणे सांगितले याचा कोणताही पुरावा नसतो. तरीही सांगायचे असल्यास स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्याने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही कारण नाही.” असे यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारले असता भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे जास्त जागा भाजप लढवेल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस म्हणाले, ” विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील, त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील.पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत, त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी याअगोदरच म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.