Girish Mahajan On Manoj Jarange Patil | ‘ओबीसीतून आरक्षण देणे अशक्य, हे जरांगेंना कळत नाही, त्याला आम्ही काय करणार’; भाजप नेत्याचे वक्तव्य

0

पुणे : Girish Mahajan On Manoj Jarange Patil | राज्यात मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) घेऊन मोठा प्रश्न उभा आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या (OBC Quota Reservation) मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजही (OBC Samaj) रस्त्यावर येऊन आंदोलन उपोषण करीत आहेत. या सर्वांमध्ये सरकारची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

त्यातच ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, हे मनोज जरांगे यांना कळत नाही, तर त्याला काय करणार, त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. निर्मल वारीचा (Nirmal Wari 2024) आढावा घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण, आंदोलन केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने आजपर्यंत जे काही करायचे होते, ते सर्व काही केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते.

तसेच, मराठा आरक्षणाच्या बाबतीत ५० वर्षांत कोणी प्रयत्न केले का? शरद पवार (Sharad Pawar) यांनी तर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, असे सांगितले होते. (Maratha Reservation Andolan)

आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण, जरांगे पाटलांचे समाधान होतच नसेल, तर आता आम्ही काय करणार?

सगेसोयऱ्यांना पण आरक्षण द्या. पण, ते न्यायालयामध्ये टिकणारच नाही. तसेच, माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारे आरक्षण देता येत नाही. पण, त्यामध्ये काही करता येत असेल, तर सरकार निश्चित प्रयत्न करेल.’ असे महाजन म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.