Maha Kumbh – Dr Ajay Sonkar | संगमावरील गंगाजल शुद्धच ! पाच घाटांवरील पाण्याचे नमून्यांचे परीक्षण, प्रयागराज महाकुंभच्या प्रदुषणावर पद्मश्री डॉ.अजय सोनकर यांचा दावा

एन.पी.न्यूज ऑनलाईन : Maha Kumbh – Dr Ajay Sonkar | एकीकडे गंगाजलाच्या शुध्दतेबाबात प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर, दूसरीकडे मात्र पद्मश्री डॉ. अजय सोनकर यांनी संगमावरील पाणी अल्काईन एवढे शुध्द असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत येऊन टेस्टिंग करण्याचे आव्हानही दिले आहे.
केंद्रीय प्रदूषण मंडळाने काही दिवसांपूर्वी NGT ला अहवाल सोपवला आहे ज्यात म्हटले आहे की, महाकुंभमधील संगमाचे पाणी अशुध्द असून त्यात फेकल कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळून आला आहे. त्यामुळे हे पाणी अंघोळीसाठी किंवा पिण्याच्या लायक नाही. या गंगाजलाच्या शुध्दतेवर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच डॉ. सोनकर यांनी त्यांच्या नैनी येथील लॅबमध्ये संगम, अरैल सहित पाच घाटावरील पाण्याचे नमून्यांचे परीक्षण केले.
त्यांनतर त्यांनी दावा केला आहे की, 57 कोटी लोक अंघोळ करून गेल्यानंतर ही पाण्याच्या शुध्दतेत काहीही फरक पडला नाही. तीन महिन्यांच्या सतत संशोधनातून गंगेचे पाणी शुध्द असल्याचे स्पष्ट होत आहे. येथे अंघोळ केल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही. बॅक्टेरियोफेज असल्यामुळे गंगेच्या पाण्याची शुध्दता अबाधित राहते. पाण्याचे नमूने लॅबमध्ये 14 तास ठराविक तापमानावर ठेवल्यानंतरही त्यात विषाणूंची वाढ झालेली नाही. गंगाजल केवळ आंघोळीसाठीच सुरक्षित नाही, तर त्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचे आजारही होत नाहीत. असा दावा देखील डॉ. सोनकर यांनी केला आहे.
गंगेच्या पाण्यात 1100 प्रकारचे बॅक्टेरियोफेज
डॉ. सोनकर यांनी म्हटले आहे की, गंगेच्या पाण्यात 1100 प्रकारचे बॅक्टेरियोफेज असताता. जे कोणत्याही हानिकारक जीवाणूंचा नाश करतात. त्यामुळे कोट्यवधी भाविकांनी स्नान करून देखील पाण्यात बॅक्टेरियाची वाढ झाली नाही किंवा पाण्याच्या पीएच पातळीत कोणतीही घट झाली नाही, असे यात दिसले आहे.
कोण आहेत डॉ. सोनकर ?
डॉ. सोनकर हे प्रयागराजच्या नैनीचे राहणारे आहेत. कृत्रिमरित्या मोती वाढवून त्यांनी मोठी क्रांती केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.