Harshwardhan Sapkal | महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ ! नाना पटोले पायउतार, प्रस्थापितांच्या नावावर काट, निष्ठावानाला संधी

मुंबई : Harshwardhan Sapkal | राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्रातील संघटना पातळीवर मोठा फेरबदल केला आहे. नाना पटोले यांना डच्चू देत बुलाढाण्याचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिली आहे. आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. सपकाळ हे गांधी परिवाराचे निकटवर्तीय मानले जातात. अत्यंत जवळचे सहकारी ते मानले जातात.
काँग्रेस हायकमांडने अनेक प्रस्थापितांच्या नावावर काट मारत सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. प्रदेशाध्यपदासाठी कोल्हापूरचे सतेज पाटील, लातूरचे अमित देशमुख, सांगलीचे विश्वजित कदम यांची नावे आघाडीवर होती. पण, प्रदेशाध्यक्ष पदावर अचानकपणे हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची कारकीर्द –
हर्षवर्धन सपकाळ (सर्वोदयी कार्यकर्ता)
जन्म ः 31 ऑगष्ट 1968
जात ः मानव
धर्म ः मानवता
राष्ट्रीयत्व : भारतीय
शैक्षणिक योग्यता : बी.कॉम, बी.पी. एड.
व्यवसाय : शेती, सामाजकारण
निवास : वर्षा सपकाळ व्हॅली, निसर्ग नगर, जांभरुण, बुलढाणा (महाराष्ट्र) 443001
संपर्क : 9422180485
परिवार :
सौ. मृणालिनी (पत्नी)
डॉ. गार्गी (मुलगी), यशोवर्धन (पुत्र)
सामाजिक क्षेत्रातील योगदान :
1) गांधी तथा विनोबा यांच्या विचारधारेवर आधारीत ग्राम-स्वराज निर्माण
2) सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरे
3) ग्रामस्वच्छता अभियान तथा आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय योगदान
4)जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्पांची अंमलबजावणी.
5)आदिवासी समुदायाचे तथा गावांचे सक्षमीकरण
राजकीय क्षेत्रातील योगदान :
1) विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष – राजीव गांधी पंचायत राज संगठन
2) जेष्ठ पक्ष निरीक्षक – ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
3) राष्ट्रीय सचिव – अ.भा.काँ. कमेटी नवी दिल्ली – सह प्रभारी गुजरात – मध्यप्रदेश – पंजाब (10 वर्ष)
4) राष्ट्रीय उपाध्यक्ष – राजीव गांधी पंचायत राज संगठन
5) माजी अध्यक्ष – जिल्हा परिषद बुलढाणा (1999 ते 2002)
6) माजी विधानसभा सदस्य- 22 बुलडाणा विधानसभा (2014 ते 2019)
7) माजी सदस्य – जिल्हा परिषद बुलढाणा (1997 से 2006)
8) शिबिर समन्वयक – गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ. कमिटी द्वारा आयोजन)
9) पक्ष निरिक्षक – अनेक राज्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने.
10) माजी उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
हर्षवर्धन वसंतराव सपकाळ यांची संक्षिप्त कारकीर्द –
तरुण वयापासूनच ते गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (छडणख) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी.पी.एड पदवी घेतली आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते.
शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.
2014 ते 2019 या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ. कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.
काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे.
यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत. एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.