Suresh Dhas | ‘एक पोलीस गेल्या १५ वर्षांपासून परळीत कसा?’, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले – ‘आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय’

Suresh-Dhas

बीड : Suresh Dhas | सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या (Santosh Deshmukh Murder Case) करण्यात आली. या घटनेनंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा प्रश्न चर्चेत आला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली. मात्र, अद्यापही एक आरोपी फरार आहे. दरम्यान या प्रकरणावर आवाज उठवताना आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच वाल्मिक कराडचे कनेक्शन, खंडणीचे प्रकार या सगळ्याला वाचा फोडण्याचे काम केले.

दरम्यान आज आज सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आणखी एक मोठा इशारा दिला आहे. ‘आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचा आहे, बीडमध्ये अजून वाळू वाले आणि राखेवाले राहिलेत. बीड जिल्ह्यातील राख सम्राटांची घरे राज्यपाल महोदयांच्या बंगल्यापेक्षाही मोठे आहेत. खरं तर इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आकाचा कार्यक्रम झालेला आहे, पण आकाच्या खालचे काही छोटे आका ते देखील शोधले पाहिजेत”, असे आमदार धस यांनी म्हंटले आहे.

आरोपी कृष्णा आंधळे हा पुरावे नष्ट करू शकतो असा संशय धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला होता. त्या विधानावर बोलताना सुरेश धस म्हणाले, ” धनंजय देशमुख हे काही चुकीचं बोलत आहेत असं नाही. कृष्णा आंधळे हा करून करून काय करणार? कृष्णा अंधाळे हा काय पुरावे नष्ट करणार? पुरावे नष्ट करण्याचे काम तर विष्णु चाटेनी केले. विष्णु चाटे त्याचं आणि आकाचं बोलणं पोलिसांसमोर जाऊ नये म्हणून त्याने प्रयत्न केला असावा. त्याने त्याचा मोबाईल पाण्यात टाकला असावा. मात्र, याबाबत पोलीस योग्य तो तपास करतील”, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

एका पोलिसाकडे १०० हायवा आणि १५ जेसीबी असल्याच्या विधानावर बोलताना ते पुढे म्हणाले, ” त्यावर अजूनही मी ठाम आहे. जर मी बोललो ते खोटं असेल तर त्याठिकाणी जाऊन पाहा. तो एक पोलीस गेल्या १५ वर्षांपासून परळी तालुक्यात कसा? एवढंच नाही तर खोट्या नोटांमध्ये देखील तो आहे. त्या पोलीस हवालदाराचा तपास होऊन जाऊ द्या. ईडीने संपत्तीची चौकशी केली पाहिजे.

तसेच बीडमध्ये अजून वाळूवाले आणि राखेवाले राहिले आहेत. अजून बऱ्याच जणांवर मकोका लागायचा आहे. आजही कोट्यवधी रुपयांचे राखेचे ढिगारे पडले आहेत. आजही रात्री नऊ नंतर राखेच्या गाड्या सुरु आहेत. याकडेही बीडच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यायला पाहिजे”, असेही सुरेश धस यांनी म्हंटले आहे.