Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून खास रणनीती; 30 मतदारसंघात बलाढ्य उमेदवार उतरवणार तर बंडखोरी रोखण्याची ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | हरियाणातील यशानंतर आता भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाजपाने खास रणनीती आखली आहे. तसेच या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. या रणनीती अंतर्गत पुणे, मुंबई आणि विदर्भावर खास लक्ष देण्यात येत आहे. (BJP Strategy For MH Election 2024)
पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार आहे. येथे अधिक बलाढ्य उमेदवार उतरवण्याचा अमित शहा यांचा प्लॅन आहे. त्यात मुंबईमधील ६, पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांचा समावेश आहे.
मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचा वरचष्मा असलेल्या ६ जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोघांकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा (MVA Seat Sharing Formula) निर्माण झाला आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे.
हरियाणामधील निकालानंतर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फिडबॅक घेण्यात येत आहे. तसेच महायुतीमधून या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच मराठा समाज (Maratha Samaj) आणि ओबीसींमध्ये (OBJ Samaj) सामंजस्य निर्माण करण्यासाठी, तसेच बंडखोर उमेदवारांची समजूत घालण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये ओबीसी आणि मराठा समाजादरम्यान ताळमेळ बसवला जाईल. दोन्ही समाजातील लोकांना समान प्रमाणात तिकीटं दिली जातील. तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्याला जवळपास अंतिम रूप दिले गेले आहे.
तसेच स्वतः अमित शहा हे याबाबतच्या रणनीतीला अंतिम रूप देत आहेत. एवढंच नाही तर ओबीसींसाठीची नॉन क्रिमीलेअरचची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.