Uddhav Thackeray | ‘आमचं सरकार आल्यानंतर सगळ्यांचा हिशोब होणार’, उद्धव ठाकरेंचा इशारा; म्हणाले – ‘आमचे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं…’

मुंबई : Uddhav Thackeray | “मोदीजी तुम्ही येत आहात जेवढ्या फिता कापायच्या त्या कापून घ्या. विधानसभेत आमचं सरकार आल्यानंतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल”, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) वतीने मुंबईच्या विलेपार्ले पूर्व (Vile Parle Mumbai) येथे ‘नव्या वाटा नवी संधी, उज्वल भविष्यासाठी साथ शिवसेनेची’ महानोकरी मेळावा (Maha Nokari Melava) आयोजित करण्यात आला होता.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी १४० नामांकित कंपन्यांनी येथे रोजगार उपलब्ध करून दिले. यात मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या तरुणांना जागेवरच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Govt) टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “मोदीजी तुम्ही येत आहात जेवढ्या फिता कापायच्या त्या कापून घ्या. विधानसभेत आमचं सरकार आल्यानंतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. लोकसंख्या वाढते पण रोजगार कोणीच देत नाहीये. मुलगी शिकली प्रगती झाली, पंधराशे देऊन घरी बसवली असं आम्ही करत नाही. आता लवकरच काही लोकं बेरोजगार होणार आहेत. त्या गद्दारांना रोजगार मिळणार नाही, यांनी केलेल्या घोटाळ्यांचा आमचं सरकार आल्यानंतर हिशोब होणार आहे,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले, ” हा एक समाधानाचा क्षण आहे. बाळासाहेब यांनी मराठी माणसासाठी नोकऱ्यांच्या संधी सुरु केल्या. नोकऱ्या देणारे बना असे बाळासाहेब म्हणायचे. आज दंगली भडकण्याचे राजकारण सुरु आहे. हिंदू मुस्लिम भांडण लावायचे.
मग तरुणांचे काय त्यांच्या कामाचे काय? मोदी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्पांचे भूमिपूजन करतात. आदित्यने पत्रकार परिषद सांगितलं शिवस्मारकाचे भूमिपूजन होऊन किती वर्ष झालं त्या कामाचं काय झालं? या प्रकल्पामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे घर भरले जातात,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“आमचे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे. मराठी माणसाला नोकरीसाठी नो एन्ट्री अशा प्रकारचे बोर्ड लागले होते, असे सगळे बोर्ड फोडून टाका. स्थानिकाला मराठी माणसाला महाराष्ट्रात नोकरी मिळायलाच पाहिजे. माझं सरकार पाडल्यानंतर एक तरी प्रकल्प मोठा सांगा जो महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात अस्थिरता दिसली आणि प्रकल्प आलेच नाहीत,” असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.