Sharad Pawar On Maratha Reservation | आरक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले – ‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी, आपण सरकारच्या बाजूने उभे राहू’

सांगली : Sharad Pawar On Maratha Reservation | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनाही दौरे करतेवेळी आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही आरक्षणाच्या मुद्यावरून घेरले जात आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजही (OBC Samaj) रस्त्यावर येऊन आंदोलन उपोषण करीत आहेत. या सर्वांमध्ये सरकारची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
याबाबत आता शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षण विधेयकामध्ये दुरुस्ती करावी. आपण सरकारच्या बाजूने उभे राहू. ५० % आरक्षणाच्या वर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे. दुरुस्ती करायला काय हरकत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. ५० टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काय हरकत नाही, ५० टक्केच ७५ टक्क्यांवर जायला पाहिजे.
तमिळनाडूमध्ये ७८% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात ७५% वर का होऊ शकत नाही. ७५ टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही,” असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.