Udayanraje Bhosale On Akshay Shinde Encounter | ‘गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे’; उदयनराजे यांची प्रतिक्रिया

Udayanaraje-Bhosale

एन.पी.न्यूज ऑनलाईन – Udayanraje Bhosale On Akshay Shinde Encounter | अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की, अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांच्यात सोडून तुडवून मारले पाहिजे. (Badlapur Case)

एकीकडे शिंदे एन्काऊंटरवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले असतानाच दुसरीकडे खासदार भोसले यांनी आपली बेधडक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी विरोधक मला काही घेणेदेणे नाही. कोणी असू दे त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून बोलत आहे. गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायव्यवस्था पाहिजे

भोसले म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात बदल करा. बलात्कार केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या. असे ही भोसले म्हणाले.

राज्य सीआयडी मार्फत चौकशी

दरम्यान ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी एनएचआरसी, न्यायदंडाधिकारी, एसीएस होम आणि सीआयडी यांना पत्र लिहून या घटनेची माहिती दिली आहे. राज्य सीआयडी (Maharashtra CID) या प्रकरणाची चौकशी करेल आणि न्यायदंडाधिकारी चौकशीही केली जाईल.

शाळा प्रशासनाला वाचवण्यासाठी प्रयत्न

शिंदेने शाळा प्रशासनावर काही गंभीर खुलासे केले होते, ते उजेडात येऊ नये यासाठी एन्काऊंटर करण्यात आलं असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील काही प्रश्न उपस्थित करून सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदेने पिस्तूलचं लॉक कसं काढलं? त्याला जर तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? यामध्ये कुणाला वाचवलं जातंय याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी ही अंधारे यांनी केली आहे.