Indrayani River | आळंदी: पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस

आळंदी: Indrayani River | आषाढी वारी सोहळा (Ashadhi Wari 2024) काही दिवसांवरच आला असताना आळंदीत वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदीतील पाण्याला फेस आला आहे. इंद्रायणी नदी पात्रात पाणी फेसाळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर दूषित आहे, जल प्रदूषणामुळे पुन्हा एकदा पाण्यावर तवंग (फेस) येत आहे. प्रदूषकांविरुद्ध अपुऱ्या अंमलबजावणीमुळे नद्यांमध्ये रासायनिक आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे सुरूच असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदायणी नदीपात्रात नजर जाईल तिथपर्यंत फेसच दिसत आहे. आळंदीत येणारा प्रत्येक वारकरी स्नान करून माऊलीच्या चरणी पुढे नतमस्तक होत असतो. अशातच आता आषाढी वारी सोहळ्याचे प्रस्थान काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय चिंतेत आहे.
कंपन्या, सोसायट्या, नाल्याचे सांडपाणी, ड्रेनेज, लाॅंड्री कपडे धुतलेले पाणी तसेच इंद्रायणी नदीकाठच्या गावातील मैलामिश्रित सांडपाणी, कारखान्यातील केमिकलयुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते इंद्रायणी नदीपात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने फेसाळलेली दिसून येत आहे.
पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ Maharashtra Pollution Control Board (MPCB) या समस्येचे निराकरण करण्यात त्यांच्या कथित निष्क्रियतेबद्दल टीकाकारांनी बोट दाखवले आहे. याबाबत नागरिक तातडीच्या कारवाईची मागणी करत आहेत, अधिका-यांना या महत्त्वपूर्ण जलमार्गांना त्रासदायक प्रदूषणाचे स्रोत ओळखण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी सखोल शोध मोहीम सुरू करण्याची विनंती करत आहेत.