Election Commission On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

मुंबई: Election Commission On Uddhav Thackeray | आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत तक्रार केलेली होती. ठाकरे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा देखील नोंदवण्याची शक्यता आहे.

” निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे” , असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.