मुंबई : एन पी न्यूज 24 – भाजपमधील नाराज नेत्यांपैकी एक असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील भाषणापूर्वीच राजकीय भूकंप घडविणारे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. पीटीआयने हे वृत्त दिले असून यामुळे राज्यातील भाजपमध्ये भूकंप झाल्याचे बोलले जात आहे.
Decision to deny tickets taken in Maharashtra, not in Delhi; Devendra Fadnavis should take responsibility for party's poll performance: BJP leader Pankaja Munde
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2019
पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना तिकीटांचे वाटप करताना काही उमेदवारांना तिकीट नाकारण्यात आले होते. तिकीट न देण्याचा हा निर्णय दिल्लीत झाला नसून महाराष्ट्रातच घेण्यात आला होता. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे पंकजा यांनी म्हटल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.
visit : npnews24.com