भोपाळ : वृत्तसंस्था – गणपती विसर्जनाप्रसंगी भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या लोकांनी भरलेली बोट उलटून त्यात ११ जणांचा मृत्यु झाला. तर ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर ही घटना गुरुवारी दुपारी ११ वाजता घडली.
हे सर्व भोपाळमधील पिपलानी येथील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे. नाव उलटल्याचे दिसल्याने एसडीआरएफच्या पथकाने रेस्क्यु ऑपरेशन सुरु करुन सात जणांना वाचविले. तलावात ११ जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
Madhya Pradesh: 11 bodies recovered at Khatlapura Ghat in Bhopal after the boat they were in, capsized this morning. Search operation is underway. More details awaited. pic.twitter.com/mEMSJdzhE9
— ANI (@ANI) September 13, 2019
एकाचवेळी या बोटीमध्ये १८ जण बसले होते. तलावाच्या आतमध्ये गेल्यानंतर गणपतीचे विसर्जन करीत असताना लोक एकाच बाजूला जास्त जण आले. त्यामुळे बोटीचा समतोल बिघडून ती उलटली.
याबाबत मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पी. सी. शर्मा यांनी प्रत्येक मृत्य व्यक्तीच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय