एन पी न्यूज 24 – संपूर्ण भारतात महिलांनी मेहंदी लावण्याची परंपरा आहे. विविध सण, शुभकार्यामध्ये महिला हात आणि पायांवर मेहंदी काढतात. परंतु, मेंदी चांगल्या दर्जाची नसेल अथवा तिच्यात रसायनिक पदार्थ मिसळलेले असतील तर मेंदीच्या रंगाचा बेरंग होऊ शकतो. यामुळे शारीरीक समस्या निर्माण होऊ शकतात. रसायनयुक्त मेहंदीमुळे नववधुच्या हाता-पायावर फोड आल्याचे तसेच त्वचा जळाल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. म्हणून भेसळयुक्त मेहंदी घेणे टाळले पाहिजे.
हे लक्षात ठेवा
१ मेहंदीमुळे कोणतीही समस्या झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. अन्यथा ही अॅलर्जी संपूर्ण शरीरात पसरू शकते.
२ मेहंदी पाच मिनिटांत रंगू शकत नाही. ही दोन ते तीन तास भिजवावी लागते.
३ खऱ्या मेहंदीचा रंग गडद काळपट लाल नसतो, तर नारंगी अथवा गडद लाल असतो.
४ मेहंदीमध्ये सोडियम पिक्रामेट हे हानिकारक केमिकल मिसळले जाते. जे ज्वलनशील पदार्थांमध्ये मिसळले जाते.
५ मेहंदीमध्ये पीपीडी मिसळले जाते. जे केस काळे करण्याच्या हेअरडायमध्ये वापरले जाते. काळ्या मेंदीसाठी याचा वापर केला जातो.
६ केमिकलच्या मेहंदीमुळे त्वचेत खाज, जळजळ, सूज व अन्य समस्या होतात. शिवाय काहीवेळा फोडसुद्धा येतात.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत